
महाराष्ट्रात मे अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता२० मे २०२५ ते ३० मे २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी हा अंदाज वर्तवला आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असूनसुद्धा अतिशय जोरात पडेल. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे-नाले भरून वाहण्याची शक्यता आहे.R
महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारीमुंबई आणि कोकणात सर्वाधिक पाऊसमुंबईत २२ मेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. २२ ते ३० मे या काळात मुंबईत विशेषतः जोरदार पाऊस होईल, असे डख सर म्हणाले आहेत. कोकण भागातही मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी.पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत पावसाचा प्रभावनाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही या काळात जोरदार पाऊस होईल. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे.नगर व मराठवाड्यात दिलासा देणारा पाऊसअहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे ओढे-नाले भरून वाहतील आणि लहान बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा वाढेल. बीड जिल्ह्यात पाण्याची टंचाई असल्यामुळे हा पाऊस फार उपयोगी ठरेल. धाराशिव, लातूर, परभणी, जालना, हिंगोली आणि नांदेडसह इतर मराठवाडा भागातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. नांदेडमध्ये वीजांचा कडकडाट होऊ शकतो, त्यामुळे झाडाखाली थांबू नये.
महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा : अनेक जिल्ह्यांत ऑरेंज आणि येलो अलर्ट जारीविदर्भातही मुसळधार पावसाची शक्यताबुलढाणा, अकोला, अमरावती आणि इतर विदर्भातील भागांमध्येही पावसाचा जोर राहील. या दहा दिवसांत दररोज किंवा दर दोन दिवसांनी वेगवेगळ्या भागांत पाऊस होईल. त्यामुळे शेवटच्या आठवड्यात अनेक ठिकाणी ओढे-नाले वाहताना दिसतील. राज्यात पाऊस न पडणारे एकही गाव राहणार नाही, असा अंदाज आहे.शेतकऱ्यांसाठी डख सरांचा सल्लाडख सरांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की, जिथे उघडं वातावरण मिळेल तिथे शेतीची कामे लवकर पूर्ण करावीत. रोटाव्हेटर किंवा कल्टिव्हेटरचा वापर करून शेत तयार करावे. असा जोरदार पाऊस क्वचितच पडतो, त्यामुळे त्याचा शेतीसाठी योग्य फायदा करून घ्यावा.वीजांच्या कडकडाटाची खबरदारी
