
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साकोरे येथे दिनांक २५ जुलै २०२५ रोजी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात व लोकशाही पद्धतीने पार पडली. या निवडणुकीत इयत्ता ५ वी ते १० वी या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला.शाळेच्या विविध गटांमध्ये (लहान, मध्यम व मोठा) मुलामुलींचे स्वतंत्र मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. सदर निवडणूक मोबाईल ईव्हीएम द्वारे घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाही मूल्य व मतदान यंत्राची ओळख होते.प्रत्येक गटासाठी स्वतंत्र मोबाईल ईव्हीएम तयार करण्यात आले होते. निवडणुकीसाठी एकूण 38 विद्यार्थ्यांनी उमेदवारी केलेली होती.या निवडणूकीत *तुषार हरिश्चंद्र खैरनार हा मुख्यमंत्री* पदावर विजयी झाला तर *उपमुख्यमंत्री म्हणून कु. साक्षी संजय पवार* ही विजयी झाली. कु.सुचिता बाबासाहेब बोरसे, साहिल दत्तू शेवाळे,कु. गौरी गणेश बच्छाव, धीरज संदीप बोरसे, पूर्वेश समाधान सोनवणे,कु. सानवी संतोष निकम या विद्यार्थ्यांची मंत्री म्हणून त्या त्या गटासाठी निवड झालेली आहे.असे शालेय अष्टप्रधान मंडळ निवडले गेले.ही निवडणुक मुख्याध्यापक श्री झाल्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री. माळी सर यांच्या नियोजनात झाली.मुख्याध्यापक श्री. झाल्टे डी. एस., श्री. भोई सर, श्री. चौधरी सर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय श्री. रमेशकाका बोरसे यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व उपक्रमांचे कौतुक केले. श्री.वाघेरे सर, श्री. सोनवणे सर,श्री वळवी सर यांनी निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडली. श्री चौरे सर यांनी व्हिडिओ द्वारे प्रसिध्दी दिली.इतर सर्व सेवकांनी नियोजनात मोलाची भूमिका बजावली. या निवडणुकीद्वारे मतदान, उमेदवारी, प्रचार, गुप्त मतदान, ईव्हीएम व मतमोजणी या संपूर्ण प्रक्रियेने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिला.शाळेतील या उपक्रमाचे ग्रामस्थ व पालकांनीही विशेष कौतुक केले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांचा विकास होण्यास मदत झाली.
