
मनमाड ( प्रतिनिधी ) मनमाड शहर भाजपा च्या वतीने पश्चिम बंगाल /आसाम /पोंडेचरी या तीन महत्वाच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वा मध्ये भाजपा ने एकहाती सत्ता मिळवली या विजयाचा आनंदोत्सव एकात्मता चौकात भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे यांच्या नेतृत्वा मध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी ढोल ताशा च्या गजरात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणा बाजी केले भारत माता की जय, वंदे मातरम, नरेंद्र मोदी तुम आगे बढो, भारतीय जनता पार्टी चा विजय असो जो राष्ट्र हीत बात करेगा करेगा वही देश पर राज करेगा अश्या जोश पूर्ण घोषणानी परिसर दुमदूमला यावेळी जोरदार फटाक्यांची आतिष बाजी करण्यात आली व मिठाई, पेढे वाटप करण्यात आले पश्चिम बंगाल /आसाम पोंडेचरी निवडणुकांमध्ये भाजपा ने ऐतिहासिक विजय मिळवला हा विजय फक्त एका पक्षाचा नाही, तर विचारांचा, संस्कृतीचा आणि राष्ट्रहिताच्या भूमिकेचा विजय आहे.जनतेने दिलेला हा कौल स्पष्ट सांगतो — देशभक्ती, विकास आणि राष्ट्र हीत सोबत जनता आहे नव्या पर्वाचीही सुरुवात झाली आहे…असे भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी या वेळी आपले मनोगता मध्ये सांगितले या विजय उत्सव कार्यक्रमाला भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी, भाजपा व्यापारी आघाडी जी अध्यक्ष कांतीलाल लुणावत, बाजार समिती चे मा अध्यक्ष दिपक गोगड,नीलकंठ त्रिभुवन, भाजपा शहर सरचिटणीस मुर्तूझा रस्सीवाला,शहर उपाध्यक्ष गणेश कासार, कैलास देवरे,सुमेर मिसर महेंद्र गायकवाड,नारायण जगताप अमोल वाघ,सर्वेश जोशी,गोविद सानप,प्रमोद जाधव,आशिष पोहाल,मनोज जंगम, कुलदीप सिंग चोटमुरादी,मुकेश वेलन्नू, आशिष भंडारी,राज परदेशीं, शब्बीर शेख, श्रीराज कातकडे, बुरन्हान शेख,संजय गांगुर्डे,सोनू गरुड, असिफ शेख बुधणबाबा शेख,अरुण जाधव,रितेश भालेराव , अमोल गोसावी, कार्तिक राऊत, सागर निकम ऋषभ राऊत आदी मान्यवर पदाधिकाऱ्यां सह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर मंडल अध्यक्ष संदीप नरवडे यांनी केले
