
निःशुल्क खुली राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन-
विषय –भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत-
नक्षत्राचं देणं काव्यमंच,मुख्यालय ,भोसरी पुणे वतीने दरवर्षी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. निबंध पाठवताना शब्दांचे बंधन नाही. आपले विचार पूर्ण होत पर्यंत आपण हा निबंध लेखन करणे आहे.
सर्व वयोगटातील विचारवंत या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. आपले लिखित साहित्य संस्थेला पाठवणे आवश्यक आहे. विषय-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत हा विषय देण्यात आलेला आहे. विजेत्यांना समारंभ पूर्वक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालय, युवक वर्ग तसेच सर्व वयोगटातील विचारवंतांनी आपले विचार या निबंधाच्या माध्यमातून व्यक्त करावे. असे आवाहान संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे. आपला निबंध दिनांक 7 एप्रिल 2026अखेरपर्यंत पाठवणे आवश्यक आहे.
निबंध पाठवण्याचा पत्ता-
प्रा.राजेंद्र दशरथ सोनवणे
अध्यक्ष
नक्षत्राचं देणं काव्यमंच
साई सदन,ए/३, महालक्ष्मी साईट्स,पीसीएमटी चौक,भोसरी पुणे ४११०३९
