
लातूर ( प्रतिनिधी ) लातूर येथील प्रसिद्ध कवी , समीक्षक लेखक यांच्या ” भारताचा पाया ” कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचा यंदाचा अरुण काळे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘ भारताचा पाया ‘ ह्या कवितासंग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, म. फुले, सावित्रीबाई फुले संत गाडगेबाबा नामदेव ढसाळ यांच्या जीवन कार्याची कलात्मक नोंद घेणाऱ्या व कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या कविता समाविष्ट आहेत. प्रा पंढरी बनसोडे यांचे आतापर्यंत पाच पुस्तके प्रकशित झाली असून ” तु घे भरारी , शब्दफुले भारताचा पाया आणि टाहो कवितासंग्रह ” आक्रोश ” हा कथासंग्रह नुकताच प्रकशित झाला आहे येत्या 30 मार्च रोजी नागपूर येथे विशेष समारंभात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे व सरचिटणीस डॉ. प्रकाश करमाडकर यांनी पत्राद्वारे कळविले आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.

