लेखन:- नितीन सावंत परभणी 9970744142

संग्रहित छायाचित्र
सिन्नर ( संकलक:- महामित्र दत्ता वायचळे ) नुकताच आम्ही पुर्णा तालुक्यातील सातेफळच्या कुंभार वस्तीला भेट दिली.सोबत होते महाराष्ट्र सरकारच्या मानव विकासचे आयुक्त मा.नितीन पाटील आणि त्यांचे इतर आधिकारी.विकासाच्या प्रक्रियेत न आलेल्या गरिब जाती जमातींसाठी काम करणारे हे आधिकारी कुंभार वस्तीत कुंभारकाम बघत होते.कुंभारकाम करणाऱ्या सर्व व्यावसाईकांना कशाप्रकारे मदत करता येइल जेणेकरून त्यांच्या व्यावसायात वृद्धी बरोबर नफाही जास्त कमावता येइल यासाठी सर्व आधिकारी आधिक माहिती देत होते.त्यांच्याकडील काही महत्वपूर्ण योजनाही सांगत होते.तशी चर्चाही करत होते.
मी अंगणात बसलेल्या एक दोन वृद्धांसोबत चर्चा करायला सुरुवात केली.बाजुला काही मडके वाळवत घातलेले होते.नवरात्रोत्सव जवळ आल्याने घटस्थापनेसाठी लागणारे ते छोटे आकाराचे गाडगे बनवले होते. मी म्हनालो ” कितीला एक जाते हे मडके ” वृद्ध आज्जोबा म्हनाले ‘ पाच रुपायाला एक ” मी आवाक झालो फक्त पाच रुपये किंमत.हल्ली काय येतेय हो पाच रुपायाला ? ” मी परत प्रश्न केला ” यासाठी वेळ किती जातो , एक मडके बनवायला ? ” ते म्हनाले ” माती भिजवने , मुरवने , चिखल घट्ट करणे ही चार पाच दिवसाची मोठी प्रक्रिया आहे. ” एक गाडग्याच्या चिखलाला आकार द्यायला विचारत असाल तर आर्धा तास जातो.” आर्ध्या तासाच्या श्रमाचे फक्त पाच रुपये ?? ते म्हनाले ” तिनशे मडके बमवायला सहा दिवस गेलेत.म्हणजे एका दिवसात ५० मडके बनवलीत.एक पाच रुपाला विकले जाते याप्रमाणे आम्हाला २५० रुपये रोज पडतो. ” मी म्हनालो ” ही तर घोर निंदा आहे तुमच्या श्रमाची आणि कलेची.” ते म्हनाले ” साहेब या वंशाला घातलेय म्हणून करावे लागते बघा. नाहीतर कुनाला हौस आहे चिखल तुडवायची. आम्हाला पर्याय आहे का दुसरा काही , नाही ना . म्हणून हे सर्व . लोक भाव पाडून मागत्यात, उलटे रेटुन बोलतात . बरोबर वागणूक देत नाहीत. आमचे आम्हालाच माहिती आम्ही कसे जगतो ते. ”
मी सिरिअस होतो आहे , हे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुखातूनही हस्याची कमाई केलेली कला दाखवली.एक म्हातारा दुसऱ्या म्हाताऱ्याला म्हणाला ” चोरी केली असती.पण आम्हाला करता येत नाही.आणि मार खाण्याजोगी तब्यतही नाही” आम्ही सगळेचजन असलो.तेवढ्या आपार मेहनतीतूनही ही मानसे आनंदी, सुखी रहातात.एकोप्याने रहातात.हसतात.दुख पोटात दाबुन ठेवतात.हजारो वर्षापासून अन्न खायला भांडी बनवून देनारा कुंभार आज व्यावसायाच्या रुपाने शेवटच्या घटका मोजत आहे.पाच रुपायासाठी तो चिखलाने हात भरवतो .तरी तो आनंदी रहातो. आणि इकडे नोकरदार वर्गाचा दोन महिने पगार नाही झाला तर बिपी वाढतो.
