
सिन्नर ( प्रतिनिधी )२७ ऑक्टोबर २०२५ आदिवासी क्रांतिकारक कोमाराम भीम यांच्या स्मृतिदिन महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे अभिवादन करण्यात आले*या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिकारक कोमाराम भीम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे म्हणाले की*कोमाराम भीम हे तेलंगणातील गोंड जमातीचे आदिवासी नेते होते, ज्यांनी हैदराबादच्या ब्रिटिश व निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि जाचक करांविरुद्ध लढा दिला. त्यांनी ‘जल, जंगल, जमीन’ या तत्त्वावर आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला कोमाराम भीम यांनी हैदराबाद संस्थानाच्या पूर्व भागात निजामाच्या शासनाविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी लोकांना एकत्र करून जाचक कर आणि जमिनीवरील अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. त्यांचा मुख्य नारा “जल, जंगल, जमीन” हा होता, आदिवासी वस्ती गोंडी लोक जमीनदार अनुवाद जमीनदार आणि व्यावसायिकांकडून आणि जंगलात ब्रिटिश पोलिसांकडून अनुवाद खंडणीद्वारे बळी पडत असताना तो आयुष्यभर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहिला.

१९०० च्या दशकात, गोंडी प्रदेशात खाणकामांचा विस्तार झाला आणि राज्य अधिकार मजबूत झाला. लागू केलेल्या आणि अंमलात आणलेल्या नियमांमुळे गोंडी लोकांच्या उदरनिर्वाहाच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला. गोंडी लोक त्यांच्या पारंपारिक गावांमधून स्थलांतर करू लागले, परिस्थितीमुळे कधीकधी सूड आणि निषेध होऊ लागले; अशाच एका घटनेत वन अधिकाऱ्यांनी भीमच्या हत्या केली.१९४० मध्ये, एका विश्वासघातामुळे झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या बलिदानामुळे ते आजही तेलंगणाच्या आदिवासी समाजात आदराने ओळखले जातात.कोमाराम भीम यांच्या कार्याची आठवण म्हणून तेलंगणा राज्यातील एका जिल्ह्याला ‘कोमाराम भीम आसिफाबाद जिल्हा’ असे नाव देण्यात आले अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन*या कार्यक्रमाचे सुञसंचलन सुरज गोसावी यांनी केले.व प्रास्ताविक विजय मुठे यांनी तर आभार प्रकाश गुंजाळ यांनी मानले* यावेळी अभिवादन करण्यासाठी महामित्र दत्ता वायचळे आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेड चे सहसंस्थापक विजय मुठे सुरज गोसावी अनिल लोणारे, प्रकाश गुंजाळ, संदीप लहामटे योगेश मोरे,लल्ला लहामगेकिरण मुठे,रोहीत मुठे रमेश सालमुठे आदि उपस्थित होते
