
मरवडे (वार्ताहर) – छत्रपती परिवार,मरवडे,ता.मंगळवेढा आयोजित ‘राैप्यमहाेत्सवी मरवडे फेस्टिवल – २०२५’ अंतर्गत राज्यस्तरीय साहित्य गाैरव पुरस्काराचे वितरण करण्यात आले. स्व.मुक्ताबाई आप्पा कुंभार साहित्य गाैरव पुरस्काराने लेखक इंद्रजीत पाटील यांना बहारदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.त्यांच्या ‘शेलक्या बारा’ या कथासंग्रहास हा पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.माजी मंत्री प्रा.लक्ष्मणराव ढाेबळे,प्रमुख पाहुणे मा.दत्तात्रय पवार साहेब,मा.प्रदीप खांडेकर,मा.अंबादास कुलकर्णी,मा.शशिकांत चव्हाण,मा.सुधाकर मासाळ इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व राेख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप हाेते.अल्पावधीतच या कथासंग्रहास नववा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला असून त्यांच्या ‘कळ पाेटी अाली आेठी’ ‘ या परिपूर्ण अष्टाक्षरी कवितासंग्रहासही यावर्षीचे पाच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. लेखक इंद्रजीत पाटील यांच्या साहित्यिक कामगिरीचे सर्वत्र काैतुक हाेत असून श्री.पंडितराव लाेहाेकरे, माधवराव कुतवळ,अमाेल कुतवळ,भागवत उकिरंडे,चंद्रकांत पाटील,रावसाहेब पाटील,संजय भड,अमाेल देशमुख,जीवराज गरड यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.प्रस्तुत पुरस्कार वितरण सोहळ्याचे मा.श्री.सुरेश पवार गुरूजी,त्यांचे कार्यकर्ते व गावकरी मंडळींनी उत्तम नियाेजन केले हाेते.
